पोस्ट्स

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी घेतली आढावा बैठक

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत उमरग्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न   आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार श्री. प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न ,  जनतेच्या अपेक्षा आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा करण्यात आली. गावागावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे ,  असे आवाहन करण्यात आले. “ उमेदवार कोणताही असो ,  त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे ,”  असे सांगत प्रामाणिक कामाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे उमरगा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार श्री प्रवीण स्वामी , माज...

धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे

इमेज
धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अक्षय संजीव ढोबळे यांची निवड झाली आहे त्यांनी महाविकास आघाडीचे अक्षय जोगदंड यांचा 13 मतांनी पराभव केला. तसेच नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पार्टी कडून सुजित साळुंखे आणि अमोल राजे निंबाळकर तर शिवसेना उबाठा कडून पंकज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पंकज भोसले यांची निवड झाली. धाराशिव नगरपालिकेचे विशेष सर्वसाधारण सभा आज 16 जानेवारी रोजी घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा सौ. नेहा राहुल काकडे मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.  यात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे नगरसेवक अक्षय जोगदंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता तर भारतीय जनता पार्टी कडून अक्षय ढोबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.यावेळी झालेल्या निवडणुकीत नगरपालिकेत बहुमतात असलेल्या भारतीय जनता पार्टीला 22 नगरसेवकांचे मतदान झाले.याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे यांचेही मत अक्षय ढोबळे या...

जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

इमेज
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत, परंतु उर्वरित दिवशी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 23, 24 आणि 27 जानेवारी असे तीन दिवस असणार आहेत. 25 आणि 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजी तर मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नलावडे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री ओमकार देशमुख पुढे म्हणाले ...

काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी

इमेज
काक्रंबा गटात अस्मिता कांबळे यांची दावेदारी धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून यात इच्छुक उमेदवारांची आपली दावेदारी इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे.  काक्रंबा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या अस्मिता कांबळे यांना भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे .तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या जिल्हा परिषदेसाठीच्या राखीव गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ अस्मिताताई कांबळे यांनी आपली दावेदारी सांगितली आहे. मागील काळात अस्मिता कांबळे या जिल्हा परिषदेला अध्यक्ष होत्या . त्यांचे वडील शिवदास कांबळे हे सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते .  त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगले असे काम केले असल्यामुळे त्यांनी काक्रंबा जिल्हा परिषद गटातून आपली मागणी लावून धरली आहे.  शिवदास कांबळे यांनी मंगरूळ आणि काक्रंबा मतदार संघामधुन निवडणूक लढवली विक्रमी मताने निवडून आले . मंगरूळ मतदारसंघातून निवडून आल्यानंतर समाज कल्याण सभापती झाले आणि काक्रंबा मतदार संघातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्...

लाखो कार्यकर्त्यामुळेच आज संघ कार्य सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

इमेज
प्रसिध्दी पत्रक  चैत्र शुक्ल तृतीया, विक्रमकसंवत २०८१ दिनांक ११.०४.२०२३, गुरुवार  लाखो स्वयंसेवकांच्या त्याग व समर्पणमुळे संघाचे आजचे विशाल स्वरूप दिसतेय – डॉ. मोहन भागवत समतायुक्त, शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी आहे संघकार्य छ्त्रपती संभाजीनगर: संघ जे करतो ते योग्यच करेल अशी भावना ठेवून लाखो स्वयंसेवक काम करत आले, म्हणून आज हे विशाल स्वरूप आपण पाहू शकतो, परंतु ज्या समर्पण व त्यागामुळे ही स्थिती आली आहे ती कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते स्व. दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव,  स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे व्यासपिठावर उपस्थित होते.  डॉ. मोहन भागवत म्हणाले, “या वास्तूच्या उभारणीमुळे सर्वांना आनंद होतोय, पण हा आनंद ज्यांच्यामुळे आला त्यांची तपश्चर्या सर्वांनी पाहिलेली नाही. त्यामुळे आपण जे सुखद परिणाम पाहतो त्यामागे निष्काम परिश्रम आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, “ज...

ब्रेकिंग

उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागीताचा मृत्यू =================================उस्मानाबाद भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातील कार्यरत कर्मचारी *हनुमंत पाटील* यांचे आज सकाळी मॅरेथॉन मध्ये सहभागी असताना निधन झाले.